या प्रकरणात रिजचा राजकीय इतिहास मांडला आहे. मागील सहस्त्रकापासून दिल्ली ही प्रामुख्याने राजकीय राजधानी आहे आणि रिजने दिल्लीच्या राजकीय भाग्यात मध्यवर्ती (दुर्लक्षित का असेना) भूमिका साकारली आहे. प्रकरणाचे तीन विस्तृत विभाग आहेत. पहिला विभाग रिजवरील सैन्य हस्तक्षेपांवर केंद्रित आहे. मध्ययुगीन शहराच्या तैमूरलंग यांच्या पाशवी हल्ल्यापासून १८५७-च्या वसाहतविरोधी बंडापर्यंत. दुसरा विभाग रिजमधील प्रतीकात्मक राज्य पुरस्कृत वास्तुकलेबद्दल आहे. रायसीना टेकडीवरील सरकारच्या सध्याच्या वास्तूचाही यात समावेश आहे. अंतिम विभागात रिजवर पुरवलेला सार्वजनिक सेवांच्या कथा सांगितल्या आहेत, सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली जंगलतोडीपासून जागतिक दर्जाच्या शहराच्या निर्मितीच्या नावाखाली वनीकरणापर्यंत.

प्रकरणाचे विभाग आणि त्यांच्यासह या प्रकरणात समाविष्ट कालावधी आणि ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत. (विशेष टिप्पणी: या चित्राची निर्मिती ते पुस्तकाचे अंतिम प्रकाशन या काळात काही बदल आणि पुनर्रचना झाली आहे.)